कबनूर नगर परिषदेसाठी कबनूर नगरपरिषद कृती समितीचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

कबनूर नगर परिषदेसाठी कबनूर नगरपरिषद कृती समितीचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

कबनूर नगर परिषदेसाठी कबनूर नगरपरिषद कृती समितीचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
कबनूर- (प्रतिनिधी चंदुलाल फकीर)कबनूर नगरपरिषद कृती समितीने ग्रामपंचायत कडून कबनूर नगरपरिषद करण्याचा ठराव मिळावा या मागणीसाठी 28 जुलैपासून मुख्य चौकातील दर्गा कट्ट्यावर बेमुदत आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.
गेली चार वर्षे कबनूर नगरपरिषदेसाठी कबनूर नगरपरिषद कृती समितीचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे ग्रामपंचायत पासून ते शासन स्तरापर्यंत लढा चालू आहे केवळ सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांचा ठराव विना विलंब पाठवावा असे पत्र शासनाकडून ग्रामपंचायतला येऊन महिना झाला तरीही अद्याप ठराव पाठवलं नाही त्यामुळे नगरपरिषद कृती समितीच्या वतीने पाच जुलैपासून येथील मुख्य चौकात दर्गा कट्ट्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते धरणे आंदोलनाला 23 दिवस झाले अध्याप  ग्रामपंचायतने कोणताही निर्णय न घेतल्याने कृती समितीने आमरण उपोषण सुरू केले आहे कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे, अजित खुडे, नितीन गवळी, उत्तम जाधव, युवराज कांबळे व बबलू सनदी, यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे कबनूर नगरपरिषद करणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी,आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख विभागाला निवेदन दिले आहे कृती समितीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला होता उपोषणाच्या पहिल्या दिवशी पदाधिकारी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व विविध मंडळाचे कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *