विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तर तो वर्ग बंद ठेवणार; राजेश टोपे यांची माहिती

जालना : राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत असून विद्यार्थींमध्ये थोडेही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवणार आहे. याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले की, लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मने एक सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षनात 62 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचे समोर आले. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचे कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केले.