आम्हाला आतातरी न्याय मिळले काय ? अनिल पाटील यांचे प्रतिपादन.
इचलकरंजी;-आनंदा शिंदे
दिव्यांग कल्याण सेवा भावी संस्थेच्या वतीने इचलकरंजी प्रांत अधिकारी यांच्या कडे सर्व दिव्यांगना १५/००० हजार रुपये पेन्शन आणि नोकरी मध्ये सामाविष्ट करून घेण्याकरिता या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
या निवेदनात मध्ये या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भारत सरकार आणि महाराज राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन करण्यात आले.
पाटील पुढे आपल्या निवेदनात असे म्हटले की.
सर्व दिव्यांगनना त्याचा कुवती प्रमाणे सरसकट नोकरी मिळावी
६० टक्क्यांच्या पुढे दिव्यांगांना मासिक मानधन म्हणून सात हजार रुपये मिळावे
सर्व दिव्यांगांना शिक्षणामध्ये शंभर टक्के सवलत मिळावी
दिव्यांगांना रेल्वे सवलतीची स्मार्ट कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र मध्ये चालू करावे
दिव्यांगांना केंद्र शासनाकडून नॅशनल हेल्थ कार्ड मिळावे
दिव्यांगांना इचलकरंजी शासकीय किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भवन बांधून देण्यात यावे
केंद्र शासन ने दिव्यांगांना घरकुल योजना फक्त आणि फक्त कागदावर न ठेवता अमलात आणावे.
महानगरपालिका नगरपालिका कडून दिव्यांगना उद्योगधंद्यासाठी दुकान गाळे उपलब्ध करून देण्यात यावे.
सर्व दिव्यांगना अंत्योदय पिवळा रेशनकार्ड याची अंबलबजावणी लवकर व्हावी.
दि अॅट्रॉसिटी कायदा प्रमाने दिव्यांगानाही कायदा झाला पाहिजेत नाहीतर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेवटी पाटील यांनी दिला
सावली दिव्यागं संस्थेचे अध्यक्ष श्री राज कुमार गजगे रोहित कागले.विनायक निकम.गणशे परमणे अमित महाजन सौ एम एम जगताप प्रमुख कार्यकर्ते बरोबरच अनेक दिव्यांग बंधू भगिनी हजर होते.
Posted inकोल्हापूर
दिव्यांग कल्याण सेवा भावी संस्थेचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
