टिळक भवन येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न!

टिळक भवन येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न!

टिळक भवन येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न!

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहिला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.

आज सकाळी ११ वा. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न झाला. शिक्षण विभागाशी संबंधित सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले त्यावर तात्काळ कार्यवाही करून ते प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, चंद्रकांत पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे, समन्वयक रविंद्र परटोले उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *