महाराष्ट्र आशा,गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी Aituc संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे दुसरे अधिवेशन संपन्न!

महाराष्ट्र आशा,गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी Aituc संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे दुसरे अधिवेशन संपन्न!


महाराष्ट्र आशा,गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी Aituc संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे दुसरे अधिवेशन संपन्न! रत्नागिरी जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांचे दुसरे अधिवेशन भैरव मंगल कार्यालय रत्नागिरी येथे रविवारी दिनांक 29 मे रोजी यशस्वीरित्या पार पाडले. या अधिवेशनामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांचे अध्यक्षीय मंडळ निवडल्यानंतर अधिवेशनास सुरुवात झाली. सुरुवातीस रत्नागिरी जिल्ह्यातील एक आशा श्रीमती नार्वेकर यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आले.
त्यानंतर युनियनचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी मागील तीन वर्षातील आशा गट प्रवर्तक यांच्या कामकाजाचा अहवाल सविस्तरपणे अधिवेशनामध्ये मांडला.
कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2010 सालापासून महाराष्ट्र आशा ,गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना लढाऊपणे कार्यरत आहे.रत्नागिरी जिल्हामध्ये ही एकच रजिस्ट्रर युनियन लढाऊपणे क्रियाशील आहे. सन 2010 पासून आशा व गटप्रवर्तक महिलांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा, किमान वेतन मिळावे व त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने आंदोलने केली आहेत.
24 जून 2021 रोजी सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर शांततामय मार्गाने आंदोलन करून सुद्धा आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी सूडबुद्धीने नऊ आशा व गटप्रवर्तक महिला यांच्यावर फोजदारी केसिस दाखल केलेल्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त या कामगार संघटनेच्यावतीनेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या केस सुरू आहे.(रीट पीटिशन नं 92900/2020) .

सध्या महाराष्ट्रामध्ये आशा महिलांना वाढीव मानधन मिळाल्यानंतर आशा महिलांना सध्या सरासरी दरमहा 10 हजार रुपये एकूण मोबदला मिळतो. तसेच गटप्रवर्तक महिलाना मानधन वाढ झाल्यानंतर सध्या एकूण दरमहा चौदा हजार रुपये पर्यंत मानधन मिळते.
परंतु महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे हे वेतन सहा सहा महिने मिळत नाही. म्हणूनच प्रत्येक महिन्याला सात तारखे पूर्वी केलेल्या कामाचा संपूर्ण मोबदला वेतन चिट्टीसहित मिळाला पाहिजे अशी मागणी अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे.
कॉ शंकर पुजारी यांनी मांडलेल्या लेखी अहवालावर खालील आशा व गटप्रवर्तक महिलांनी आपली मते व्यक्त केली.पल्लवी पारकर, सनमुखी देसाई, विद्या भालेकर, विजय शिंदे, सोनाली बाईत, अस्मिता सोनाळकर, रेश्मा कदम, वृंदा विखारे, संचीता म्हस्कर, दर्षणा साळवी, एस आर देसाई व अरुणा चिंचणकर यांनी आपली मते मांडली. यानंतर अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी खालील पदाधिकारी सर्वानुमते निवडण्यात आले.
विद्या भालेकर सरचिटणीस, विजया शिंदे अध्यक्ष, पल्लवी पारकर सचिव, अरुणा चिंचवलकर उपाध्यक्ष, संजीवनी तीवरेकर उपाध्यक्ष, अनुष्का मोरे उपाध्यक्ष व सन्मुखी देसाई सचिव
महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना Aituc

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *