रत्नागिरी : राज्यात सुरू होणाऱ्या गर्दीच्या हंगामाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना परिवहन आयुक्त यांनी खासगी वाहतूकदारांनी निर्धारीत करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.
गर्दीच्या हंगामात खासगी बस मालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि . मी . भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी सातत्याने खातरजमा करण्यात यावी, या प्रकरणी वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी,असे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि . मी . भाडेदराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही , असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत . यानुसारच आकारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.