मोलकरीण महिलांना घरे, पेन्शन व इतर मागण्यांच्यासाठी सांगली जिल्ह्यातील मोलकरीण महिलांचा भव्य मेळावा संपन्न

<em>मोलकरीण महिलांना घरे, पेन्शन व इतर मागण्यांच्यासाठी सांगली जिल्ह्यातील मोलकरीण महिलांचा भव्य मेळावा संपन्न</em>


मोलकरीण महिलांना घरे, पेन्शन व इतर मागण्यांच्यासाठी सांगली जिल्ह्यातील मोलकरीण महिलांचा भव्य मेळावा संपन्न
सांगली निवारा भवन येथे बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी ठीक दुपारी एक वाजता झालेल्या मेळाव्यामध्ये बोलताना ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, 99 टक्के मोलकरीण महिलांना स्वतःचे पक्के घर नाही, दुसऱ्या बाजूस देशातील सर्व जनतेला ज्यांचे पक्के घर नाही त्यांना घर देण्यात येईल अशी घोषणा भारत सरकारने केलेली आहे.त्याची ताबडतोब अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे. तसेच म्हातारपणाची सोय म्हणून 55 वर्षानंतर प्रत्येक मोलकर्णीन स्त्रीला दरमहा किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे असे सांगितले. या मागण्यांच्या संदर्भात मेळाव्यात जमलेल्या सर्व मोलकरीण महिलांनी जोरदार समर्थन केले.
म्हणूनच किमान सांगली जिल्ह्यातील सर्व मोलकर्णी महिलांना पक्के घर मिळालेच पाहिजे या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले.
यानंतर मोलकरीण महिला संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी सांगितले की,मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने आश्वासन दिलेले होते की मोलकरीण महिलांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा पेन्शन देण्यात येईल. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र अजूनही पेन्शनचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केलेला नाही. इतकेच नव्हे तर मोलकरीण महिलांच्यासाठी जे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आलेले त्याला सुद्धा पुरेसा निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत नाहीत.
याबरोबरच संघटनेच्या वतीने मागणी करीत आहोत की, म्हातारपणाची सोय म्हणून प्रत्येक मोलकरणी महिलेस 55 वर्षे झाल्यानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे. सर्व मोलकरण महिलांना आठवड्यातून एक दिवस पगारी सुट्टी मिळाली पाहिजे. मोलकरीन महिलांना प्रत्येक दिवाळीस एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळाला पाहिजे.मोलकरीण महिलांच्या कुटुंबीयांना मोफत औषध उपचार मिळाले पाहिजेत. सर्व मोलकरीण महिलांच्यासाठी आरोग्य विमा सुरू झाला पाहिजे. पूर्वीच लागू असलेल्या योजनेनुसार ज्या मोलकर्णी महिलेचे वय 55 वर्षे झालेले आहे त्यांना दहा हजार रुपये सन्मान धन त्वरित मिळाले पाहिजे. मोलकरीण महिलांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. कामाचे तास ठरवून मिळाले पाहिजेत. तसेच मोलकरीण महिलांना किमान वेतन ठरवून मिळाले पाहिजे.
याबाबत मेळाव्यामध्ये उषा तलिकोटी, सीमा वाघमोडे, शारदा कांबळे, द्रौपदी तलवार, अनिता आवळे व अश्विनी दबडे महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. मेळावा यशस्वी करण्यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्या शाबिरा शेरकर व सना मुल्ला इत्यादींनी परिश्रम घेतले.असे पत्रक महाराष्ट्र घर कामगार मोलकर्णी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी प्रसिद्धस दिलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *