एशियन कॉलेजमध्ये ‘चर्चा केंद्रीय अर्थसंकल्पाची २०२६’ सत्राने व्याख्यानमालेचा शुभारंभ

एशियन कॉलेजमध्ये ‘चर्चा केंद्रीय अर्थसंकल्पाची २०२६’ सत्राने व्याख्यानमालेचा शुभारंभ

एशियन कॉलेजमध्ये ‘चर्चा केंद्रीय अर्थसंकल्पाची २०२६’ सत्राने व्याख्यानमालेचा शुभारंभ

पुणे (प्रतिनिधी):

धायरी येथील ‘एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स’च्या वाणिज्य विभागांतर्गत पाच दिवसीय गेस्ट लेक्चर सीरिजचे (व्याख्यानमाला) आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात ‘चर्चा केंद्रीय अर्थसंकल्पाची २०२६’ या महत्त्वपूर्ण विषयाने करण्यात आली. या सत्रात प्रसिद्ध लेखिका आणि रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका प्रा. डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

व्याख्यानमालेचे उद्घाटन

​कार्यक्रमाचे उद्घाटन आबेदा इनामदार महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले. यावेळी महाविद्यालयाच्या अध्यक्षा डॉ. अनिता सापटे, उपाध्यक्ष आनंद सापटे आणि सचिव अनिल सापटे यांनी या पाच दिवसीय उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुरेश धारणे, उपप्राचार्य अंकुश जाधव आणि सामाजिक कार्यकर्त्या एच. सी. सविता शेटीया यांची प्रमुख उपस्थिती होती.

कौशल्याधारित शिक्षणाची गरज

​उद्घाटक डॉ. एम. जी. मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम आणि कौशल्याधारित शिक्षण भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा व्याख्यानमालांमधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचा सुवर्णसंधी म्हणून लाभ घ्यावा.”

विकसित भारतासाठी अर्थसंकल्पाचे महत्त्व

​प्रमुख वक्त्या डॉ. रिता शेटीया यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि व्यावहारिक उदाहरणांसह ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’ उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, “केवळ सरकारीच नव्हे, तर वैयक्तिक जीवनातही अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, निधीचा पारदर्शक वापर आणि विकासाचे फळ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हेच अर्थसंकल्पाच्या यशाचे गमक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय गाठून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या त्रिसूत्रीवर भर देणे गरजेचे आहे.”

सहभाग आणि संयोजन

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शहाणे आणि योगिता राऊळ यांनी केले. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी श्रीमती श्रुती रेगे, वैशवी जेटके, शुभम कदम, पूर्णिमा तिडके, कमल जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील चार दिवस विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *