मंगळवार तारीख 20 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या जोरदार आंदोलनांमध्ये प्रचंड संख्येने अशा गटप्रवर्तक महिलांनो सहभागी व्हा! चलो मुंबई.
12 जानेवारीपासून महाराष्ट्रातील 76000 आशा व गटप्रवर्तक महिलांनी बेमुदत संपाला सुरुवात केलेली आहे. संपाबरोबरच अनेक जिल्ह्यामध्ये आणि मुंबई आझाद मैदान मध्ये प्रचंड निदर्शने आंदोलने सुरू आहेत .
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी ठाण्यामध्ये तीस हजार महिलांनी जाऊन मागण्या मंजूर करण्याची मागणी केली.
एक ऑक्टोबर 2023 रोजी बे मुदत संपाची नोटीस दिल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या मंजूर केलेल्या नाहीत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व दोन हजार रुपये भाऊबीज आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ देण्याबद्दल निर्णय दिला. परंतु त्याची अंमलबजावणी तर महाराष्ट्र शासनाने केलीच नाही उलट उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले की आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधनवाढ निर्णय घेण्याचा आरोग्यमंत्र्यांना अधिकारच नाही. अशा प्रकारे मंजूर केलेल्या मागण्या महाराष्ट्र शासन उधळून देण्याचे कारस्थान करीत आहे.या महिलाद्रोही कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लढाऊ आमदार विद्याताई चव्हाण यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची 14 फेब्रुवारी भेट घेतली असता त्यांनी असे सांगितले की आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्राचे राज्य मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. आझाद मैदान मधूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर नितीन करी यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी दोन दिवसांमध्ये अहवाल देण्यात येईल असे सांगितलेले आहे. हे दोन दिवस आता पूर्ण झालेले आहेत तरीही अद्याप अहवाल दिलेला नाही. म्हणूनच मंगळवारपासून महाराष्ट्रातील सर्व सर्व आशा गट प्रवर्तक महिलांचे तीव्र आंदोलन करण्यासाठी सर्वांनी मुंबईच्या येणे आवश्यक आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आजाद मैदान मध्ये संपावरील महिलाना भेट देऊन आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या मान्य होण्याच्या संदर्भामध्ये जे प्रयत्न केले आहेत त्याच्याबद्दल आशा गटप्रवर्तक संयुक्त संघटना कृती समितीच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली याबद्दलही त्यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले.
मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबई आझाद मैदान येथे मिळेल त्या मार्गाने वाहनाने यावे. असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनच्या राज्य जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
.