राज्यस्तरीय उल्लास मेळावा संपन्नकिरण लोहार यांचा सन्मान

राज्यस्तरीय उल्लास मेळावा संपन्नकिरण लोहार यांचा सन्मान

राज्यस्तरीय उल्लास मेळावा संपन्न
किरण लोहार यांचा सन्मान

कोल्हापूर,दि. ३० (प्रतिनिधी) उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रम – ‘जन जन साक्षरता ‘या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ठोस अमंलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार यांनी केली.
वय वर्षे १५ ते त्यापुढील वयोगटातील निरक्षर लोकांना(असाक्षर )पायाभूत साक्षरता, संख्यज्ञान , जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी स्वयंसेवक, शिक्षक , विद्यार्थी यांना उचित मार्गदर्शन करत स्वतः पुढाकार घेऊन काम केले. त्याच बरोबर पुणे येथील रत्नागिरी जिल्ह्याची स्टॉल मांडणी पाहून महेश पालकर , संचालक योजना , राजेश क्षीरसागर उपसंचालक योजना पुणे यांनी भेट देऊन तयारी पाहून समाधान व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्या ने केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजा बद्दल रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी राज्यस्तर नवभारत साक्षरता मेळावा , एस सी आर टी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. शिक्षणाधिकारी (योजना ) डॉ.किरण लोहार यांच्या या सेवेचा सन्मान शिक्षणमंत्री नाम. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सचिव अर्चना शर्मा , प्रधान सचिव आय ए कुंदन , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , राज्य प्रकल्प संचालक आर विमला , संचालक राहुल रेखाराव , शिक्षण संचालक शरद गोसावी , संचालक कृष्णकुमार पाटील , शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नंदकुमार बेडसे , शिक्षण संचालनालय (योजना )महाराष्ट्र राज्य डॉ. महेश पालकर या मान्यवरांची उपस्थिती होती. किरण लोहार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *