तथागत गौतम बुद्धांचे अत्त दिप भव तत्वज्ञान आजच्या तरुणांना आत्मनिर्भर बनवते – अमोल कुरणे

तथागत गौतम बुद्धांचे अत्त दिप भव तत्वज्ञान आजच्या तरुणांना आत्मनिर्भर बनवते – अमोल कुरणे

तणावाने भरलेल्या आणि भौतिक सुखाकडे चाललेल्या समाजाला बुद्धांचा सम्यक मार्गच महत्त्वाचा आहे. त्यांचे समतेचे विचार,अहिंसा, करुणा ही त्रि:सूत्री विश्वबंधुत्वा साठी महत्वाची आहे. बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे ‘अत्त दीप भव’ म्हणजेच स्वतःचा स्वतःच प्रकाश बना ही कल्पना तरुणांना आत्मनिर्भरतेकडे जाणारी आहे. असे मनोगत पत्रकार अमोल कुरणे यांनी बुद्ध जयंती प्रसंगी व्यक्त केले.

कोल्हापुरातील शास्त्रीनगर बुद्ध गार्डन येथे सर्वधर्मीय समितीतर्फे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजक अमोल कुरणे यांनी बुध्दमूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण, पंचशील, धम्मपालन गाथा पठण करण्यात आली.
यावेळी रवींद्र कुरणे, अमोल कुरणे, पंडित चौगुले, निवास सूर्यवंशी, सर्वधर्मीय समितीचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, मनीषा घुणकीकर, संचिता ठोंबरे, सुवर्णा कुरणे, मनीषा ठोंबरे, प्रियंका कुरणे, मनीषा कांबळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी, प्रशांत अवघडे आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *