वसईत ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने’चा ऐतिहासिक प्रवेश सोहळा;
मुंबई, ठाणे व पालघरमधील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश; ॲड. किरणराव मोरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
वसई (प्रतिनिधी): मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक सक्रिय सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना’ या संघटनेत अधिकृत प्रवेश केला. वसई पूर्व येथील एव्हरशाईन सिटी, वसंतराव नाईक चौक परिसरातील ‘विश्वासम्राट बुद्ध विहार’ येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मुंबई महानगर प्रदेशात संघटनेची ताकद कैक पटीने वाढली असून, आगामी काळात सामाजिक चळवळ अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
हा सोहळा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. श्री. अरुण जी. मेढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पँथरआर्मी प्रमुख मा. श्री. संतोष आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सल्लागार आणि महाराष्ट्र प्रभारी वरिष्ठ पत्रकार श्री. उमेश जामसंडेकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती.
शोषितांच्या न्यायासाठी लढा – उमेश जामसंडेकर
यावेळी बोलताना श्री. उमेश जामसंडेकर यांनी सांगितले की, “पँथर आर्मी प्रमुख संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात शोषितांच्या न्यायासाठी लढा देत आहे. आज झालेल्या या ऐतिहासिक पक्षप्रवेशामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना अधिक आक्रमकपणे कार्य करेल”.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा
या सोहळ्यात अनेक मान्यवरांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आली. प्रामुख्याने ॲड. किरणराव मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी, तर श्री. विनोद पवार यांची पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मुख्य विभागातील महत्त्वाच्या नियुक्त्या:
ॲड. सचिन गुप्ता: सचिव, महाराष्ट्र प्रदेश
श्री. राजेश गोडांबे: विरार शहर अध्यक्ष
श्री. महेंद्र कांबळे: सदस्य, महाराष्ट्र प्रदेश
श्री. राजेंद्र पवार: नालासोपारा शहर प्रमुख
सदस्य, पालघर जिल्हा: श्री. नवनाथ कांबळे, श्री. मार्कंड शेंडे, श्री. रामचंद्र पांचाळ, श्री. चंद्रकांत गांगुर्डे, श्री. अशोक भंडारी
महिला आघाडीची नवी फळी:
महिला सक्षमीकरणासाठी संघटनेने मजबूत फळी उभी केली असून खालील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या:
ॲड. किरण म्हात्रे: महासचिव, महिला आघाडी महाराष्ट्र
श्रीमती अकिला शेख: अध्यक्ष, महिला आघाडी ठाणे जिल्हा
श्रीमती हीना खान: उपाध्यक्ष, महिला आघाडी ठाणे जिल्हा
सौ. मनालीताई लांडगे: सदस्य, महिला विभाग महाराष्ट्र
सौ. आशा मगरे: सदस्य, महिला विभाग महाराष्ट्र प्रदेश
महिला सदस्य (जिल्हा स्तर): सौ. कावेरीताई धाडवे (पालघर), सौ. आफ्रिन खान (ठाणे), सौ. रेखा ठोंबरे (पालघर), सौ. जान्हवी शेलार (पालघर), सौ. रेखा कांबळे (पालघर)

या सोहळ्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी संघटनेची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
