कोल्हापुरात छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या जागी भव्य स्मारकाची मागणी

कोल्हापुरात छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या जागी भव्य स्मारकाची मागणी

कोल्हापुरात छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या जागी भव्य स्मारकाची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी):

कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी रेल्वे स्टेशन समोरील ‘जुने रेस्ट हाऊस’ या जागेवर छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांनी लढा अधिक तीव्र केला आहे. याच पार्श्वभूमीवर, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची भेट घेऊन यावर्षीचा जयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले.

​ऐतिहासिक ठेवा आणि अस्मितेचा लढा

​रेल्वे स्टेशन समोरील जुने रेस्ट हाऊस ही जागा केवळ एक वास्तू नसून आंबेडकरी समाजासाठी आणि संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी एक ऐतिहासिक ठेवा आहे. याच ठिकाणी या दोन महामानवांची भेट आणि सहवास घडला होता. या जागेचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी पोलीस खात्याच्या सहकार्याने येथे जयंती उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा अखंड सुरू राहावी आणि या जागेवर स्मारक व्हावे, हा कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय बनला आहे.

​विविध संघटनांचे पोलीस प्रशासनाला निवेदन

​आज जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्याशी संवाद साधला. यावर्षीचा जयंती महोत्सव अत्यंत भव्य आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पोलीस प्रशासनाने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​मान्यवरांची उपस्थिती

​यावेळी समितीचे निमंत्रक विद्याधर कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नेते आर. बी. कोसंबी, जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष डी. जी. भास्कर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई, महाराष्ट्र बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल माने, धम्म संघाचे प्रा. अशोक चोकाककर, बहुजन परिवर्तन पार्टीचे अध्यक्ष बाजीराव नाईक, सामाजिक कार्यकर्ते रंगराव कामत, पीआरपीचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे, प्रा. सुहास निर्मळे, अनिल चौधरी व जयदीप कांबळे उपस्थित होते.

आवाहन:

“हा ऐतिहासिक ठेवा जपणे आपले कर्तव्य आहे. यावर्षीचा जयंती महोत्सव भव्य प्रमाणात होणार असून, जनतेने मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे,” असे आवाहन स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *