
इचलकरंजी दि .सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 746 कोटी रुपयेचा निधि लाडकी बहीन योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयासमोर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले व राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले .
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसाद विनायकराव कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी 02/05/2025 रोजी काढलेल्या जी .आर . नुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा कडील 410 कोटी 30 लाख रुपये आणि आदिवासी विकास विभागाकडील 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीन योजने करिता वळीवण्यात आला आहे . या शासन निर्णयाचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला .
अर्थसंकल्पात अनु जाती व अनुसूचित जमातीचा निधी हा त्याच सर्वगातील विकासाठी खर्च करावा असा केंन्द्र सरकाच्या निति आयोगाकडील मार्गदर्शक सूचना असताना हे राज्य शासन पळवाटा शोधून अनु जाती व अनुसूचित जमाती यांचा निधीवर दरोडा टाकत आहे .राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनु . जाती उपयोजना ( SCSP) करिता 22 हजार 658 कोटी तर अनुसुचित जमाती उपयोजना (TSP ) 21 हजार 495 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . त्या पैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग साठी सहाय्यक अनुदान ( वेतनेतर ) तीन हजार 960 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे . त्या पैकी 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीन योजनेला वर्ग करण्यात आला . तसेच आदिवासी खात्याकडील तीन हजार 420 कोटी रुपये सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहीण योजने करिता वळवण्यात आला असे एकुन 746 कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागाला वर्ग केला गेला आहे
अनु जाती व अनुसूचित जमातीच्या विकासाचा निधि इतर खात्याकडे विळविणे म्हणजे अर्थिक नाकेबंदी करून त्यांना मुलभूत विकासापासुन वंचित ठेवणे असा होतो .
केंन्द्र सरकारच्या निति आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार अनु जाती व अनुसूचित जमाती यांना अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक असते . पण हे राज्य सरकार निति आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना तिलांजली देऊन त्याचे आर्थिक हक्क नाकारत आहे . या समाजाचा शैक्षणीक सामाजिक व आर्थिक विकास होऊ नये या जातीवादी मानसिकतेतून त्यांच्या हक्काचा निधि इतर खात्याकडे वळवून त्यांना विकास योजना पासुन वंचित ठेवत आहेत . आंदोलना दरम्यान आंदोलकाच्या शिष्टमंडळानी प्रांत कार्यालयातील शिरेस्तेदार नायब तहसीलदार संजय काटकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले . यावेळी काटकर यांनी आंदोलकाच्या भावना राज्य शासनाकडे कळवू असे अभिवचन दिले .
या आंदोलनात पँथर आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ॲड ममतेश आवळे ,कोल्हापुर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर , जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव नितेश दिक्षांत , संतोष करात , बाळू कराळे , दिपक कांबळे, सुभाष कांबळे , नितिन घावट , अक्षय कदम आदीच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते .