पॅंथर आर्मीचा भाजपा -महायुतीचे उमेदवार सुहास राजमाने यांना पाठींबा
रुई / प्रतिनिधी हातकणंगले तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास राजमाने, पंचायत समितीचे सौ. मीनल मगदूम आणि अश्विनी पवार यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुहास राजमाने यांना सुपूर्द करण्यात आले.

विकासाच्या मुद्द्यावर ‘पॅंथर आर्मी’ महायुतीसोबत
पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार डॉ अशोकराव माने बापू यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यात होत असलेली विकासकामे, शैक्षणिक सुधारणा, आरोग्य व्यवस्था आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा विचार करून हा ‘बिनशर्त’ पाठिंबा देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
प्रचाराला मिळणार मोठी चालना
या प्रसंगी बोलताना सुहास राजमाने म्हणाले की, “पॅंथर आर्मीच्या पाठिंब्यामुळे मला जिल्हा परिषदेत कार्य करण्यासाठी नवा उत्साह मिळाला आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.” पॅंथर आर्मीच्या या निर्णयामुळे महायुतीचे पारडे जड झाले असून, आगामी निवडणुकीत याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते:
- संतोष आठवले (संस्थापक प्रमुख पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना)
- अभय कुमार काश्मिरी (संचालक, जवाहर सहकारी साखर कारखाना)
- वैभव पवार, संभाजी बनणे
- मच्छिंद्र रुईकर (जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर)
- संजय कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), नितीश कुमार दीक्षांत (जिल्हा महासचिव)
- राजू मोमीन (तालुकाध्यक्ष), भैय्यासाहेब धनवडे, भिकू कांबळे, अमर ढंग
कार्यक्रमाच्या शेवटी, पॅंथर आर्मीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.

