वैकुंठ नाकारणारे :संत जगद्गुरु तुकोबाराय
विज्ञान ज्ञान गुणे अधिकार पावला !
तोची वाखाणीला सर्व जगी !
असे म्हणणा-या संत तुकोबाराय यांना छ. शिवराय हे आपले गुरू मानायचे त्यांचा जन्म इ.स.१६०८ मध्ये देहु येथिल मोरे मराठा- कुणबी घराण्यात झाला होता. त्यांनी गाथा लिहली होती त्या गाथेतील एका एका अभंगावर आजचे तरुण पीएचडी करताना दिसताहेत ही खुप कौतुकास्पद गोष्ट आहे पण त्यांचे खरे कार्य आणि विचार समाजापर्यंत गेले अथवा काही बांडगुळांनी जाऊ दिले नाहीत ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
गाढवाच्या लाथा गाढवाशी गोड ! त्याशी काय चाड जनलोका !
ऐशापरी नाचे किर्तनात नट ! वागणे ओखट असुनीया !
क्रियेवाचूनीया भजन वाचाळ ! शीण त़ो केवळ शरीराशी !
म्हणे विश्वंभर शुध्द अचरण ! याहुनी भजन वांझ आहे !.
आमच्या लोकांना तुकाराम महाराज याच्याबद्दल माहीती आहे ती फक्त तुकराम महाराज आले त्यांनी गाथा लिहिली अन् ते गरूडावर बसून सदेह वैकुंठाला गेले, येवढ्यापलीकडे काही माहित नाही. परंतू काल्पनिक नसलेल्या गरुडापलीकडेही तुकोबाराय आहेत. हे कधी आजच्या नकली पोटभ-या महाराजांनी आमच्या बहुजन समाजाला सांगितलेच नाही. ते केवळ बनावट कथा सांगून लोकांना हासवण्याचा धंदा करताना दिसतात पण त्या बांडगुळांसाठी विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
काय म्हणे आम्ही केले अन्नदान ! जेवल्या जेवण भरविले !
कथा किर्तनाने काय साधविले ! बुवा जगविले अनाठायी !
गावी उभारीले हरिनाम सप्ते ! गोळा केले हप्ते नाडवूनी !
ऐशीया गवारा बोले विश्वंभर ! शाळेला छप्पर धड नाही !.
आजचे तथाकथित किर्तनकार केवळ समोर बसलेल्या लोकांना काल्पनिक कथांचा भडीमार करुन खळखळून हासवून त्या लोकांची मने जिंकण्याचा करून कोट्यावधी रुपयांची माया जमवण्यासाठी ‘अंखड हरिनाम सप्ताह’ यांचा बाजार मांडताना दिसतात. पण गरूडापलीकडचे तुकोबाराय यांनी त्यांच्या अभंगातून अशा दलालांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे म्हणून तर खास तुकोबांच्याच शब्दात सांगाव वाटत की,
कीर्तनाचा विकरा मातेचे गमन ! भाड खाई धन विटाळ तो !
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ती ! इजभर पोट भरिती चांडाळ ते !.
आमच्या बहुजन समाजाने खरे तुकोबाराय व त्यांनी लिहलेली गाथा वाचली असती तर आजच्या तथाकथित महाराजांनी जी ‘खंड न पाडण्याची म्हणजे अंखड’ चावण्याची जी दुकानदारी मांडली आहे ती बंद पाडली पाडून या तथाकथित पोटभरूच्या पेकाटात लाथा घातल्या असत्या हे मात्र निश्चित.
आता आमचे बहुजनातील तरुण म्हणतील की, गरुडापलीकचे तुकोबाराय म्हणजे नेमकं काय ? तर त्यांना सांगाव वाटत की, तुकोबा हे शेतक-याचे कर्ज माफ करणारे पहीले शेतकरीपुत्र आहेत. त्यांनी त्यांच्या अभंगातून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडलेला आहे. त्यांनी परस्री रक्माई समान म्हणून महीलांचा आदर केला. हे त्यांचे गरुडापलीकडे आहे. हे बहुजन समाजाने समजून घेतल पाहीजे. जो तथाकथित किर्तनकार किर्तनाच्या माध्यमातुन जर तुकोबा वैकुंठाला गेला अस सांगू लागला तर त्याला प्रश्न विचारा की, रामदास वैकुंठाला कसा गेला नाही ?तो पापीष्ट होता म्हणून का ?तुकोबांच्या काळात विमान होते का ?त्या विमानाचा पायलट कोण होते ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
वैकुंठासी वाट दाखवी आम्हाशी ! येवू तुकोबाशी घेऊनिया !
ग्रहगोल आम्ही पालथे घातले ! वैकुंठ दिसले नाही कोठे !
कैलास पाताळ स्वर्ग आणि नर्क ! उगाच हे मुर्ख बोंबलती !
म्हणे विश्वंभर पुरावा न देतो !बारा बापाचा तो समजावा !
जोपर्यत तुम्ही तथाकथित किर्तनकारांना तर्कावर अधारित प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यत हे तुकोबांचा खुन पचवण्यात यशस्वी होतील पण तुम्ही जर तर्कावर आधीरीत प्रश्न तथाकथित किर्तनकाराला केले तर तो रामदास ज्याप्रमाणे सावधान म्हटल्यास मंडपातून धूम ठोकला होता तसाच हा पोटभरू तथाकथित किर्तनकार रामदासाच्या पावलावर पाऊल ठेऊन पसार होईल. कारण हेच तथाकथित सांगतात की, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’ त्या तथाकथित भामट्यांना विद्रोही कवी विश्वंभर वराट हे म्हणतात की,
विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
तुकोबाचा टाळ बोले चिपळीला ! वैकुंठी ना गेला तुका माझा !
पांडुरंग सुध्दा निष्ठुर निघाला ! चुकवीला घाला नाही कैसा !
अखेर भटाने बोलुनिया गोड ! केली धुळवड तुकोबाची !
म्हणे विश्वंभर सांगुनिया सांग ! विमानाने माग बुजवील !.
काही काल्पनिक ग्रंथात असे सांगितले की, खीर खाल्याने पुत्रप्राप्ती होते तर काही आजही म्हणतात की, आंबे खाल्याने पाहीजे त्याला मुल होत त्याच काल्पनिक ग्रंथाचा व काल्पनिक कथांचा भडिमार आजचे तथाकथित किर्तनकार लोकांना सांगतात पण तुकोबाराय नेमक काय म्हणतात हे समजून घेणे काळाची गरज आहे. पण प्रश्न पडतो की, आजच्या किर्तनकारांचा तुकोबाराय समजले का ?जगद्गुरु तुकोबांनी ४५० वर्षांपूर्वी सांगितले होते की,
नवसे कन्यापुत्र होती, तरी का करणे लागेपती !
तरीपण अमेरिकेत एकादशी आहे असे सांगणारे महाराष्ट्रातील काही दंगलखोर म्हणतात की, माझ्या मित्रांच्या शेतातील आंबा खाल्ल्यास पुत्रप्राप्ती होते. पण आज जर तुकोबाराय असते तर त्या मनोहर कुलकर्णीचे नाव घेऊन म्हटले असते की,
अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड ! काय त्यास रांड प्रसवली !
हेच विज्ञाननिष्ठ तुकोबाराय आमच्या बहुजन समाजाने समजून घेतले पाहीजे अन्यथा भिडे अन् किडे पुत्रप्राप्तीसाठी काहीही खाऊ घालतील त्यामुळे वेळीच सावध झाले पाहिजे. तसेच आज जे काही तथाकथित पोटभरे महाराज प्रबोधनकाच्या नावाखाली कोणत्या तरी ग्रंथात लिहलेले आहे म्हणून सम-विषम तिथेचे समर्थन करून स्वत:ची बौध्दीक वेश्यागिरी करतात तेव्हा तुकोबाराय म्हणतात की,
मेळवूनि नरनारी ! शिकून सांगे नानापरी !
तुका म्हणे मैंद ! नाही त्यापाशी गोविंद !
तसेच
मुखे सांगे ब्रह्मज्ञान ! जन लोकाची कापितो मान !
ज्ञान सांगतो जनासी ! नाही अनुभव आपणासी !
कथा करितो देवाची ! अंतरी आशा बहु लोभाची !
तुका म्हणे तो चि वेडा ! त्याचे हाणूनि थोबाड फोडा !.
पावसाळा आला की जसा बेडकांचा सुळसुळाट होतो तसेच उन्हाळा आला की, बहुजन समाजात काही बांडगुळं गावागावात स्पेशल दर्शन आणि प्रवचन सोहळा किंवा भागवत कथा यांचे आयोजन करण्यासाठी सामान्य लोकांकडून देणगीच्या नावाखाली गावातील लोकांची खिस्से कापताना दिसतात पण भागवत कथेविषयी विष्णू तपसे हे एका कार्यक्रमात म्हणतात की, ‘ज्यांच भागत नाही ते भागवत कथा करतात’. मग तरीही लोक त्या भागवत कथा, किर्तनकार यांना लाखो रूपयांची सुपारी देताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. पण तुकोबाराय म्हणायचे की,
जेथे करावे कीर्तन ! तेथे सेवू नये अन्न !
गळा घालू नये माळा ! बुक्का लावू नये भाळी !
तृटा मागू नये दान ! करूनी हरिदासाची कथा !
जे द्रव्य घेती आणि देती ! दोघेही नरका जाती !.
आमचा बहुजन समाज आजही मंदीराच्या पाय-या झिजवताना दिसतो पण तुकोबाराय म्हणतात की,
देही असोनिया देव ! वृथा फिरतो निर्देव !
देव आहे अंतर्यामी ! व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी !.
भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक असून तथागत गौतम बुद्धांचे चिवर, तुकोबाराय यांचा फेटा व शिवरायांनी वापरलेली पताका ही भगवीच होती परंतू आज काही भामटे तो रंग मलीन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात त्याविषयी तुकोबाराय म्हणतात,
‘भगवे जरी श्वान सहज वेष त्याचा ! तेथे अनुभवाचा काय पंथ !’
आज काही तथाकथित महाराज सांगतात की, तुकोबाराय विमानावर बसून सदेह वैकुंठाला गेले. पण आमच्या मनात संशय येतो की, तुकोबाराय यांचा भार एक गरुड नामक पक्षाने घेतला असेल का ?जे तुकोबाराय त्यांच्या अभंगांत म्हणतात की,
नाही देवापाशी, मोक्षाचे गाठोडे ! मोक्षपद तुच्छ केले या करणे !
आम्हा जन्म घेणे युगायुगी ! भय नाही जन्म घेता !
मोक्षपदी हाणू लाथा ! इह लोकाचा हा देहे !
देव इच्छीताती पाहे ! नलगे देवा तुझे आम्हाशी वैकुंठ !
जगद्गुरु तुकोबाराय यांनी ‘नलगे देवा तुझे आम्हाशी वैकुंठ’ म्हणून काल्पनिक वैकुंठ नाकारला त्या वैकुंठाला तुकोबाराय गरुडावर बसून जातील कशाला ?म्हणूनच तर वाटते की, तुकोबांची हत्या घडवून आणली असावी. कारण प्रश्न त्यांनाच पडतात ज्यांची मती आणि निती भष्ट आणि भ्रमिष्ट नसते म्हणून तर तुकाबांची हत्या की वैकुठगमन या विषयावर इंजि. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘संत तुकारामांचा खून रामदासी ब्राम्हणांनी केला’ असे पुस्तक लिहिले त्यात ते म्हणतात की, तुकोबाराय आपल्या किर्तनातून वैदिक ब्राम्हण बहुजनांना कसे लुटतात हे सांगून देव, दैव, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, वैकुंठ, नशीब हे सर्व खोटं असल्याचं मांडत. हे ब्राम्हणांच्या पोटाचे धंदे असल्याचे सांगत तसेच अणु – रेणू सारखे शब्द वापरून विज्ञानवादाचा सिध्दांत मांडत होते. त्यामुळे ब्राम्हणांचे पित्त खवळले त्यामुळे एकेदिवशी लोक धुळवडीच्या रंगात व नशेत असताना भट्ट मंबाजी, भट्ट सालोमालो व इतर ब्राम्हण देहुत घुसून तुकोबारायांना ओढत ओढत इंद्रायणी काठावर आणले व तिथेच मारून टाकून त्यांच्या शरीरास दगड बांधून वाहत्या पाण्यात फेकून दिले ती तारीख इ.स. ०९ मार्च १६५०. ही घटना गावातील खंडू मांग नावाच्या एका तरुणाने पुर्णपणे पाहीली होती. तसेच विद्रोही कवी म्हणतात की,
माझ्या तुकोबाचा पचविला खून ! गरुड विमान भासविले !
भटा ब्राम्हणाने केली मखलाशी ! विवेक कोणाशी तेव्हा नाही !
किर्तनात मान हलवती रेडे ! वैकुंठाचे कोडे ना पडते !
म्हणे विश्वंभर कैसे जनावर ! विज्ञान विचार यांशी नाही !.
ज्या लोकांच्या घरातील मुलं विदेशात जाऊन शिक्षण घेतात तर शेतक-यांची मुलं सैन्यात भर्ती होतात पण तथाकथित काही मनुवादी विकृतीं जेव्हा सैनिकांच्या पत्नींचा अवमान करतात तर काहीं शहीदांना दहशतवादी म्हणतात तेव्हा तुकोबाराय यांचा अंभगाची आठवण होते,
शुरा साजती हतियारे ! गांढ्या हसतील पोरे !.
तुकोबाराय यांनी गाथेत लिहिलेला शब्द ना शब्द आज खरा ठरतो. त्यामुळे त्यांचा किती दुरदृष्टीकोन होता हे समजून घेणे आवश्यक आहे.
‘बोले तैसा चाले ! त्याची वंदावी पाऊले !’
असे तुकोबाराय म्हणत पण आजचे आमचे प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी खुप काही आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात त्यांचं कार्य काहीच नसतं म्हणून तर प्रा. गंगाधर बनबरे म्हणतात की, बोले तैसा थोडा थोडा तरी चाले ! त्याची वंदावी पाऊले ! पण बोले तैसा थोडाही न चाले ! त्याची तोडावी पाऊले ! हे आमच्या बहुजन समाजाने लक्षात घेतलं पाहीजे तेव्हा ख-या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय यांना खरे अभिवादन ठरेल.
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२