केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

नव्या जनगणनेत बौद्धांची ‘अनुसूचित जाती’ म्हणून नोंद करण्याची मागणी; पदोन्नतीतील आरक्षणाबाबतही चर्चा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची ‘राजभवन’ येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील प्रलंबित सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर केले.

​सुरुवातीला, ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना बुद्धमूर्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देऊन, तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

महत्त्वाच्या मागण्या आणि चर्चा:

  • बौद्धांची जनगणनेत नोंद: महाराष्ट्रातील ज्या अनुसूचित जातीतील नागरिकांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे, त्यांची आगामी जनगणनेत ‘अनुसूचित जाती’ (SC) म्हणूनच नोंद करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आठवले यांनी केली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतराचा संदर्भही राज्यपालांना विशद केला.
  • पदोन्नतीतील आरक्षण: अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय (OBC) सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, अशी विनंती करण्यात आली.
  • गायरान जमिनींचे नियमितीकरण: गायरान जमिनींवर १४ एप्रिल २००० पर्यंत झालेली अतिक्रमणे नियमित करावीत, या मागणीचे निवेदनही यावेळी देण्यात आले.

राज्यपालांचे आश्वासन:

​या सर्व विषयांवर राज्य सरकारला योग्य निर्देश देण्याची मागणी ना. आठवले यांनी केली. त्यावर, “सादर केलेल्या निवेदनातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिले.

शिष्टमंडळाची उपस्थिती:

​यावेळी ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळानेही राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:

  • पद्मश्री सुखदेव थोरात (उपाध्यक्ष, पी. ई. सोसायटी)
  • वासुदेव गाडे, चंद्रशेखर कांबळे
  • अविनाश महातेकर (राष्ट्रीय सरचिटणीस, रिपाइं)
  • गौतम सोनवणे (राज्य सरचिटणीस)
  • सिद्धार्थ कासारे (मुंबई अध्यक्ष)

​या प्रसंगी पप्पू कागदे, कांतिकुमार जैन, पोपट शेठ घनवट, सोहेल शेख, अशोक घोटेकर, सुनील बन्सी मोरे यांसह रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *